
Tej Police Times
सुपीनाथ महाराजांच्या मंदिरातील ‘अग्नीपरीक्षे’साठी सुरुवातीला खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर ग्रामस्थ खड्ड्यात लाकडे जाळतात. या जळालेल्या लाकडांमुळे तयार झालेल्या निखाऱ्यांची गावकऱ्यांकडून विधीवत पूजा केली जाते. त्यानंतर मग धगधगत्या निखाऱ्यांवरुन चालत भाविक पुढे जातात. विशेष म्हणजे, या तप्त निखाऱ्यांवरून चालल्यानंतर भाविकांना कोणतीही इजा होत नाही, अशीही भाविकांची श्रध्दा आहे. पती-पत्नीने जोडीनं सुपीनाथाकडे साकडं घालण्याची परंपरा आहे. मनातली इच्छा पुर्ण झाल्यावर जोडीनं सुपीनाथाप्रती कृतज्ञता म्हणून या अग्निपरीक्षेतून म्हणजेच लखलखत्या निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहेय.
वाचाः पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर
मात्र धगधगत्या निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चमत्कार नसल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं. कारण जेव्हा आपण कुठल्याही आगीला अथवा निखाऱ्याला हात लावल्यास २ सेकंदापेक्षा जास्त स्पर्श टिकून राहला तरच त्याचा चटका जाणवतो. मात्र एका सेकंदात निखाऱ्याला किंवा आगीला हात लावून पटकन हात मागे ओढून घेतला तर त्याचा चटका जाणवत नाहीये, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
या निखाऱ्यांवरून चालल्यानंतर लोकांना कोणतीही इजा पोहोचत नाही किंवा त्यांच्या पायाला चटके बसत नाहीत व ते सुरक्षित राहतात, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखेडे यांनी दिली आहे. दरम्यान श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा ही फार पुसट आहे. श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म होतो. पुरोगामी महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जपतांना अशा प्रथा, परंपरांकडे चिकित्सकपणे पहावं, एवढीच माफक अपेक्षा आहे, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय.
वाचाः मुंबईच्या व्यक्तीने इगतपुरीत संपवलं आयुष्य; हॉटेलच्या रुममध्येच…
Recover your password.
A password will be e-mailed to you.