तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

गोरं होण्याचा अट्टहास नडला! फेअरनेस क्रीमने दिला किडनीचा आजार; मुंबईतील बडे डॉक्टरही हैराण

0 27

मुंबई: अकोल्यातील २० वर्षीय विभा (नाव बदलले आहे) बायोटेकचे शिक्षण घेते. तिने ब्युटीशियनकडून स्थानिक कंपनीने तयार केलेले फेअरनेस क्रीम वापरले. हे क्रीम लावल्यानंतर लगेचच लोकांनी तिचा ग्लो वाढल्याचा आणि फेअर लूकचे कौतुक करू लागले. विभाने आई आणि मोठ्या बहिणीला देखील हे क्रिम लावण्यास सांगितले.

मात्र या तिघींचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण चार महिन्यातच २०२२च्या सुरुवातीला. या तिघींनाही ग्लोमेरुलोनेफ्राइटिस झाला. यामुळे त्यांच्या किडनीत दोष निर्माण झाला. ज्या डॉक्टरांनी किडनी आजारा शोध लावला ते मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात आले. अनेक तासांच्या ऑनलाइन विचार मंथन झाल्यानंतर केईएममधील नेफ्रॉलोजीचे प्रमुख डॉ.तुकाराम जमाले आणि अकोल्यामधील डॉ.अमर सुल्तान यांनी यावर काम सुरू केले. जमाळे आणि सुल्तान यांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे विभा, तिची आई आणि मोठी बहिण यांच्यात एक गोष्ट साम्य होती ती म्हणजे त्यांनी वापरलेली फेअरनेस क्रीम होय.

वाचा- माझ्याकडे LIC पॉलिसी आहे, अदानींमुळे माझे पैसे बुडतील का? जाणून घ्या नेमकं सत्य काय

केईएमच्या आयुर्वेद प्रयोगशाळेत फेअरनेस क्रीमसह अन्य वस्तूंची चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल हाती आल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला. विभासह तिघींनी वापरलेल्या फेअरनेस क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. प्रत्यक्षात १ पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) पेक्षा कमी असावी असा नियम आहे. विभाच्या रक्तात पाऱ्याचे प्रमाण ४६ होते. हे प्रमाण सामान्यपणे ७ पेक्षा कमी असावे.

पारा हा मानवी शरिरासाठी विषारी असतो. ज्यामुळे मेलानोसाइट्सची वाढ थांबते. जी पिगमेंटेशनसाठी गरजेची असते. डॉक्टांनी सांगितले की, फेअरनेस क्रीम पाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते, ज्यामुळे त्या गोऱ्या होत होत्या पण किडनीवर परिणाम देखील होत होता.

वाचा- Dipa Karmakar Ban: जिम्रॅस्ट दीपा कर्माकरवर मोठी कारवाई; अपात्रतेसह २१ महिन्यांची बंदी

विभा अजून पूर्णपणे बरी झाली नाही. पण तिची आई आणि मोठी बहिण ठीक झाल्या आहेत. सौंदर्यप्रसाधनांमध्ये अशा प्रकारच्या जड धातूंचे प्रमाण आढळणे ही नवी बाब नाही. २०१४ मध्ये, दिल्लीस्थित CSE ने ३२ क्रीम्सची चाचणी केली आणि त्यांना १४ मध्ये जड धातू असल्याचे आढळले. अकोला येथील घटना म्हणजे हिमनगाचे फक्त टोक आहे, असे डॉ जमाले म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.