
Tej Police Times
विशेष म्हणजे दुष्काळी, कमी पावसाच्या इतर कुठल्याही पट्ट्यापेक्षा खानापूर घाटमाथ्यावर या गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. हे पीक घेण्यासाठी मध्यम जमीन लागते. वातावरण कोरडे असले तरी गारवा आवश्यक असतो. या दोन्ही गोष्टी रेणावी, रेवणगाव, घोटीखुर्द, घोटी बुदुक घोडेवाडी, ऐनवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, तामखडी अडसरवाडी या घाटमाथावरील गावच्या शेतामध्ये मिळतात. खानापूर घाट माथ्यावर ८ ते १० गावांत मिळून किमान १२५ ते १५० एकरात या शेत गहू पिकाचे उत्पन्न घेतले जातो. त्याला ‘हवेवरचा गहू’ असंही म्हणतात. इतर सर्व गव्हांच्या वाणापेक्षा हा वेगळा असतो. या शेतगव्हाचा बाजार भाव सुद्धा इतर गव्हाच्या तुलनेत जास्तीचा असतो.
आजारी नार्वेकर अचानक वर्षावर, यांच्याकडून आम्ही कोणत्या निकालाची अपेक्षा करावी? उद्धव ठाकरेंचा सवाल
शेत गव्हाची वैशिष्ट्य:
या गव्हाच्या चपात्या किंवा पोळ्यांचा रंग लालसर असतो. त्या अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पचायला हलक्या तसेच आरोग्यास चांगल्या असतात. याचे बियाणे स्वतंत्रपणे या भागातील शेतकऱ्यांकडे संरक्षित केलेले आहे.
शेत गव्हाची पेरणी होते कधी?
साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला म्हणजे दसरा झाल्यानंतर या गव्हाची पेरणी केली जाते. त्यानंतर साडेचार ते पाच महिन्यात हे पीक येते. थंडीच्या दिवसातील वातावरण या पिकाला पोषक असते. रब्बी हंगामात जमिनीतल्या ओलीवर येणारा हा गहू आहे. त्यासाठी एकदाही पाणी द्यावे लागत नाही. एकरी २० किलो गव्हाचे बियाणे लागते. त्यात एरवी ५ ते ६ क्विंटल (कधी कधी ६ ते ७ पोतीसुद्धा) उत्पन्न निघते. हे वाण दुर्मिळ असल्यामुळे सध्या परंपरागत काही लोकांच्याकडेच उपलब्ध आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.