
Tej Police Times
अशा दबावांविरुद्ध न्यायव्यवस्था बळकट करावी आणि तिचे पावित्र्य आणि स्वायत्तता जपण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखालील न्याययंत्रणेला करण्यात आले आहे. न्यायपालिका हा लोकशाहीचा आधारस्तंभ राहणे तसेच बदलत्या राजकीय हितसंबंधांच्या लहरीपणापासून मुक्त राहणे गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
निवृत्त न्यायमूर्तींद्वारे सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र म्हणजे न्याययंत्रणेला धमकावण्याच्या धोरणाचाच भाग आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. निवडणूक रोखे यंत्रणेला भारतातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार घोटाळा म्हणणारी न्याययंत्रणा, मणिपूरमध्ये घटनात्मक यंत्रणा बिघडली आहे असा ठपका ठेवणारे सर्वोच्च न्यायालय यांना धमकावण्यासाठी ‘मोदी-स्नेही’ निवृत्त न्यायाधीशांनी हे पत्र लिहिले आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. न्यायपालिकेला सर्वांत मोठा धोका हा काँग्रेसकडून नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.