Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चीनच्या भीतीने काँग्रेसने अरुणाचल प्रदेशात आपला उमेदवार उभा केला नाही? सोशल मीडियावरील दाव्याचं सत्य काय?

11

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी असताना अनेक पोस्ट समोर येत असतात. काही पोस्ट फेक, तर काही खऱ्या असतात. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे, की काँग्रेसने चीनच्या भीतीने अरुणाचल प्रदेशात आपला आपही उमेदवार उभा केला नाही. इतकेच नाही, तर व्हायरल पोस्टमध्ये असंही म्हटलं जातंय, की राहुल गांधींनी उत्तर-पूर्व राज्यातून भारत जोडो न्याय यात्रा काढल्यानंतरही अरुणाचल प्रदेशपासून अंतर राखलं आहे. मात्र, विश्वास न्यूजने या व्हायरल पोस्टची पडताळणी केली असता, ही बाब खोटी असल्याचं समोर आलं आहे. पक्षाने या राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांना तिकीट दिलं आहे. आसामनंतर भारत जोडो न्याय यात्रा अरुणाचल प्रदेशातच गेली होती.
Fact Check: अरुण गोविल यांनी दलित कार्यकर्त्याच्या घरी जेवण केलं नाही? काय आहे सत्य

काँग्रेसवरील व्हायरल पोस्ट काय होती?

सोशल मीडिया युजर ‘I HATE AAP PARTY’ ने व्हायरल (आर्काइव लिंक) शेअर करत असा दावा केला आहे, की काँग्रेस पक्षाने चीनच्या भीतीने अरुणाचल प्रदेशात आपला उमेदवार उभा केला नाही. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेक इतर युजर्सने याच दाव्यासह ही पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल पोस्टमध्ये दुसरा दावा असा करण्यात आला आहे, की उत्तर-पूर्व सुरू झाल्यानंतरही राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा अरुणाचल प्रदेशातून गेली नाही.

cngress

पडताळणीत दावा खोटा असल्याचं समोर

निवडणूक आयोगाची अधिसूचनेनुसार, (आर्काइव लिंक) अरुणाचल प्रदेशातील दोन्ही लोकसभा जागांच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादी तपासण्यात आली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर असलेल्या आकडेवारीनुसार, अरुणाचल प्रदेश (पूर्व) लोकसभा जागेसाठी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज भरला होता, ज्यात १० जणांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. याच जागेसाठी काँग्रेसचे उमेदवारी बोसीराम सिराम आहेत. तर अरुणाचल प्रदेश (पश्चिम) लोकसभा जागेसाठी काँग्रेसचे उमेदवारी नाबाम तुकी उभे आहेत.

लोकसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकादेखील होत आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत आणि एएनआयच्या रिपोर्टनुसार (आर्काइव लिंक) काँग्रेसने एकूण ३४ जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा चुकीचा तसंच वस्तुस्थितीपासून दूर आहे, की काँग्रेस चीनमुळे अरुणचल प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवत नाही.

त्याशिवाय दुसऱ्या व्हायरल होणाऱ्या दाव्याचंही सत्य समोर आलं आहे. २० जानेवारी २०२४ च्या सीएनबीसी १८.कॉमच्या रिपोर्टनुसार, आसाममधून राहुल गांधंची भारत जोडो न्याय यात्रा अरुणाचल प्रदेशात पोहोचली, जिथे अरुणाचल प्रदेश काँग्रेस प्रमुख नाबाम तुकी यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं.

व्हायरल पोस्टमध्ये केले गेलेले दोन्ही दावे समजून घेण्यासाठी नाबाम तुकी यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी व्हायरल दावा फेक असल्याचं म्हणत सांगितलं, की ‘काँग्रेस अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका लढवत आहे.’
Fact Check : AAP नेत्या आतिशी यांनी ‘जय श्री राम’ घोषणा दिल्यानंतर माफी मागितली? व्हायरल व्हिडिओचा दावा खोटा
ज्या ग्रुपमध्ये व्हायरल पोस्ट शेअर करण्यात आली आहे तो पब्लिक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तीन हजारांहून अधिक सदस्य आहेत. निवडणुकांशी संबंधित इतर दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट दाव्यांची चौकशी करणारे फॅक्ट चेक रिपोर्ट विश्वास न्यूजच्या निवडणूक विभागात वाचता येतील.

निष्कर्ष

अरुणाचल प्रदेश लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चीनमुळे उमेदवारांना तिकीट न देण्याचा काँग्रेस पक्षाचा दावा चुकीचा आणि निवडणूक अपप्रचार आहे. काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागांवर निवडणूक लढवत असून एकूण ६० जागांच्या विधानसभेत त्यांनी ३४ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

राहुल गांधींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा

(This story was originally published by Vishvas News, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.