Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लिंग समानतेसाठी ३०० वर्षे शक्य, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे मत

5

वॉशिंग्टन : ‘व्यापक भेदभाव आणि मानवी हक्कांचे सर्रास होणारे उल्लंघन यामुळे लिंग समानतेचा संघर्ष अधिकाधिक कठीण होत आहे. यामुळे महिलांच्या कायदेशीर समानतेसाठी अनेक शतके लागू शकतात,’ असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सांगितले.‘याबाबतचे सर्वांत ज्वलंत उदाहरण अफगाणिस्तानमधील आहे. तेथे सत्ताधारी तालिबानने मुलींना सहाव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण, घराबाहेरील रोजगार आणि उद्याने आणि हेअर सलूनसह बहुतेक सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली आहे. असेच सुरू राहिल्यास सध्याच्या बदलाचा का‌ळ विचाराक घेता, महिलांसाठी कायदेशीर समानता प्राप्त होण्यासाठी ३०० वर्षे लागू शकतात,’ असेही गुटेरस म्हणाले. गुटेरेस यांनी लिंग-आधारित हिंसाचाराची सततची महामारी, किमान २० टक्के लिंग-आधारित वेतनातील असमानता आणि राजकारणातील महिलांचे कमी प्रतिनिधित्व याकडे लक्ष वेधले. या वेळी उदाहरण देताना त्यांनी सप्टेंबरच्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जागतिक नेत्यांच्या वार्षिक मेळाव्याचा उल्लेख केला. तेथे केवळ १२ टक्के महिला वक्त्या होत्या.
VIDEO: कार्यक्रमावेळी फडणवीस दोनदा उठले, सुप्रिया सुळेंपासून दूर कोपऱ्यात गेले; ‘तो’ कॉल कोणाचा?

‘नारीशक्ती’चे कौतुक

‘भारतीय महिलांचा त्यांच्या देशाच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे. शाश्वत शेतीपासून आधुनिक तंत्रज्ञानात महिलांचे नेतृत्व पाहायला मिळते,’ अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांनी भारताच्या ‘नारी शक्ती’चे कौतुक केले. आंध्र प्रदेशातील अराकू खोऱ्यातील आदिवासी समुदायांनी पिकवलेल्या ‘अराकू कॉफी’बाबत जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनने शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘अर्थकारण आणि डिजिटल तंत्रज्ञानापासून ते आरोग्य, शिक्षण, अंतराळ आणि विमान वाहतुकीपर्यंत भारतीय स्त्रियांचे वर्चस्व दिसले आहे. भारतीय महिला विविध क्षेत्रांत करीत असलेले नेतृत्व जगभरातील राष्ट्रांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे,’ अशा भावना ७८व्या अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. डेनिस फ्रान्सिस यांनी या वेळी व्यक्त केल्या.

‘शाश्वत शेती पद्धतींमध्ये महिलांची भूमिका : अराकू कॉफीची विलक्षण कथा’ या कार्यक्रमाद्वारे अराकू कॉफीच्या ‘सीड-टू-कप’ या प्रवासातून शाश्वत शेती पद्धतींमधील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला. ‘भारतातील महिला आणि शाश्वत शेती पद्धती यांच्यातील दुवा उल्लेखनीय आहे. भारत सरकारचे नेतृत्व आणि देशपातळीवरील अन्न प्रणाली संवर्धन पुढे नेण्याच्या कार्यक्षमतेबद्दल कौतुक करू इच्छिते,’ असे संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमिना महंमद म्हणाल्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.