
Tej Police Times
राजकीय घडामोडींचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचं वारंवार रायबरेली आणि अमेठीला येणं जाणं असायचं. जेव्हा सोनिया गांधींनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हा शर्मा यांनी त्यांच्या प्रचाराला भक्कम पाठिंबा दिला. नंतर जेव्हा सोनिया गांधींनी राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली आणि रायबरेलीत गेल्या तेव्हा शर्मा यांनी दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी स्वत:कडे घेतली. कालांतराने अनेकांनी काँग्रेस सोडली तरीही शर्मा यांची पक्षाशी निष्ठा कायम राहिली. त्यांनी कधी बिहारचे प्रभारी पद भूषवले, तर कधी पंजाब समितीचे सदस्य आणि एआयसीसीच्या सदस्यपदाची जबाबदारी सुद्धा चोखपणे वठवली. बहुतांश वेळा निवडणुक प्रचाराची धुरा सुद्धा त्यांच्याकडेच राहिली. परिणामी गांधी घराण्याशी निष्ठा ठेवल्याबद्दल त्यांना त्याचे फळ मिळाले आहे.
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे
रायबरेलीत सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत शर्मा यांनी त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक ती मदत केली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे सोनियांच्या महत्त्वपूर्ण विजयात मोलाचा वाटा होता. काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी नमूद केले की, “राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सरकारी योजनांच्या प्रचारासाठी युवक काँग्रेसच्या लोकांना तैनात केले होते. त्यानंतर किशोरीलाल यांना अमेठीत समन्वयक बनवण्यात आले. त्यांचे रायबरेली आणि अमेठीशी ४० वर्ष जुने नाते आहे. प्रत्येक घरात लोक त्यांना ओळखतात. शर्मा यांचे समर्पण आणि गांधी घराण्याशी असलेले संबंध या बाबींनी त्यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रदेशाच्या राजकारणातील त्यांचा सहभाग अनेक दशकांपर्यंत आहे, ज्यामुळे ते रायबरेली आणि अमेठीमध्ये एक परिचित आणि विश्वासू व्यक्ती बनले. मतमोजणी सुरू असताना, के एल शर्मा यांच्या आघाडीने त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव आणि काँग्रेस पक्ष आणि या प्रदेशातील गांधी घराण्याच्या वारशासाठी दीर्घकाळची बांधिलकी दर्शवली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.