Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीचे करवतीने केले तुकडे; ९ वर्षानंतर आरोपीला मिळाला जामीन

8

लखनौ : उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ मधील ९ वर्षापूर्वी घडलेल्या गौरी हत्यांकांडाने सर्वांनाच हादरवून टाकले होते. आरोपी हिमांशु प्रजापती याच्यावर या हत्येचा आरोप होता. हिमांशुने एकतर्फी प्रेमातून गौरीच्या शरीराचे करवतीने तुकडे करत गोणीत भरले होते. त्यानंतर त्याने शहिद पथ येथे वेगवेगळ्या ठिकाणी तुकडे फेकले. या घटनेत पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता. न्यायालयात प्रभावी पुरावे सादर न केल्याने त्याचा फायदा आरोपीला झाला. उच्च न्यायालयाने या गुन्ह्यातील आरोपी हिमांशु प्रजापतीला याला आता जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या हत्याकांडाची चर्चा पुन्हा सुरु झाली.कायद्याचे शिक्षण घेणारी १९ वर्षीय विद्यार्थीनी गौरी श्रीवास्तव लखनौच्या अमीनाबादमध्ये राहत होती. गौरी ही स्वतंत्र विचाराची आणि मोकळ्या मनाची मुलगी होती. तिचे वडील शिशिर श्रीवास्तव यांचे अमीनाबादमध्ये एक दुकान आहे. गौरीची आई तृप्ति श्रीवास्तव गृहीणी आहे. गौरी त्यांची एकुलती मुलगी होती. त्यांचे कुटुंब सुखी होते. पण १ फेब्रुवारी २०१५ रोजी अशी एक घटना घडली ज्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली. या घटनेची कल्पना तिच्या आईवडिलांनी कधीच केली नसेल ते घडले. या दिवशी दुपारी १२:३० वाजता गौरी तिच्या वडीलांचे जॅकेट ड्रायक्लीनिंग करण्यासाठी घरातून निघाली होती. त्यानंतर तिने आईला मंदिरात जाणार असल्याचे सांगितले. हीच त्यांची शेवटची भेट ठरली.
Shocking Crime: पोरामुळे माझ्या ४ नोकऱ्या गेल्या, घरात अन्नाचा कण नाही! लेकाला संपवून आई बॉडीशेजारीच बसली

गौरी घरातून निघाली पण सायंकाळी ४ वाजले तरी घरी परतली नाही. त्यामुळे गौरीच्या आईने तिला फोन केला पण तिने फोन उचलला नाही. तिच्या आईने पुन्हा फोन केला पण काही उत्तर मिळाले नाही. गौरीच्या आईला चिंता वाटू लागली म्हणून तिने आपल्या पतील फोन केला. फोन करून गौरीच्या आईने सांगितले की, गौरी अजून घरी परतली नाही आणि फोनही उचलत नाही. त्यानंतर गौरीच्या वडीलांनी तिला फोन लावला. ते अनेक वेळा फोन करत राहिले त्यानंतर एका मुलाने फोन उचलला व तुम्ही चिंता करू नका, गौरी रात्रीपर्यंत घरी येईल असे बोलून फोन कट केला. वडीलांनी पुन्हा फोन केला तेव्हा मुलाने तसेच उत्तर दिले. त्यांनी गौरीसोबत बोलायचे असे त्या मुलाला बोलताच त्याने फोन कट केला.

सायंकाळचे पाच वाजले वडील घरी परतले व त्यांनी आपल्या पत्नीस थोडा वेळ वाट बघू असे सांगितले. त्यांना वाटले गौरी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असेल. पण रात्र झाली तरी गौरी न परतल्याने त्यांना भिती वाटू लागली. त्यांनी परत गौरीला फोन केला पुन्हा मुलानेच फोन उचलला. गौरी त्याच्यासोबत इको पार्कमध्ये आहे आणि ती लवकरच घरी येईल असे मुलाने सांगितले. आईवडिलांना संशय वाटू लागला त्यामुळे त्यांनी पोलिसांनी सगळी माहिती दिली. या आधी त्यांनी गौरीला परत फोन केला तेव्हा मुलाने गौरीची तब्येत ठीक नाही त्यामुळे तिला एसजीपीजीआई दवाखान्यात नेले असल्याने त्याने सांगितले. तिचे आईवडिल त्या दवाखान्यात गेले असता तिथे गौरी नावाची कोणती मुलगी दाखल नसल्याचे कळले.
Fake Jewellery Alert: अमेरिकन महिलेची भारतात ६ कोटींची दागिने खरेदी; मायदेशी स्टॉल लावला अन् पायाखालची जमीन सरकली

गौरीचे आईवडिल त्यानंतर इको पार्क येथे गेले पण तेथे सुद्धा त्यांना गौरी दिसली नाही. त्यांनी पुन्हा गौरीला फोन केला पण फोन बंद असल्याचे त्यांना कळले. चिंताग्रस्त आईवडिलांनी अमीनाबाद पोलिस ठाणे गाठले. तिच्या वडिलांनी पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चौकशीस सुरुवात केली. रात्र उजाडली तरी काही माहिती मिळाली नाही. २ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ७ वाजता शहीद पथ मार्गावर लोकांना एक गोणी पडलेली दिसली. त्याच्या आवतीभोवती कुत्रे फिरत होते. कुत्रे गोणींचा वास घेत होत. काही वेळानंतर कुत्र्यांनी गोणी फाडण्यास सुरुवात केली. त्यात व्यक्तीचे कापलेले पाय दिसले. कुत्र्यांनी त्याला खाण्यास सुरुवात केली. मानवाचे पाय दिसताच लोकांनी पोलिसांना या बद्दल माहिती दिली व कुत्र्यांना तेथून हकलवले.

पोलिसांनी तपास सुरू केला..

या घटनेची माहिती मिळताच, पोलिस शहिद पथ येथे पोहचले आणि मानवाचे पाय ताब्यात घेतले. पोलिसांनी आजूबाजूला तपास सुरू केला. जवळच असलेल्या झाडाजवळ त्यांना एक गोणी मिळाली. त्यात मनुष्याचे कापलेले हाथ आणि डोके मिळाले. मुलीचा मृतदेह असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि शरीराचे अन्य तुकडे ताब्यात घेतले. रस्त्यावरील गोणीतील तुकडे दवाखान्यात पाठवले. लखनौ मधील या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. ही बातमी वेगाने राज्यात पसरली. मुलगी अजून घरी न परतल्याने गौरीचे आईवडिल चिंतेत होते. टीव्ही वर जेव्हा त्यांना एका मुलीचा मृतदेहाची माहिती मिळाली तेव्हा ते घाबरले आणि देवाकडे प्रार्थना करु लागले की तो मृतदेह त्यांच्या मुलीचा नसावा.
Crime News: माझ्यावर प्रेम करत असशील तर जीव देऊन दाखव, प्रेमवेड्याने जे केलं त्याने कुटुंब हादरलं

३ फेब्रुवारी २०१५ रोजी पोलिसांनी गौरीच्या आईवडिलांना मृतदेहची ओळख पटवण्यासाठी दवाखान्यात बोलवले. त्यांनी जसा मृतदेह बघितला तसे त्यांना रडू कोसळले. तो मृतदेह गौरीचाच होता. पोलिसांनी हे प्रकरण खुनाचे मानून तपासणीस सुरुवात केली. प्रसारमाध्यमांसह सोशल मिडियावर गौरी हत्याकांडामुळे वातावरण तापले होते. पोलिसांनी गौरीचे कॉल डिटेल्स काढले पण काही हाती लागले नाही. गौरीच्या मोबाइलवर सर्वाधिक फोन तिच्या आईवडीलांचेच होते. बाकी ज्या लोकांचे नंबर गौरीच्या मोबाइलमध्ये होते त्यातून काही विशेष माहिती मिळाली नाही.

पोलिसांनी त्यानंतर गौरीचे शेवटचे लोकेशन शोधले यातून त्यांना गौरी शेवटी तेलीबाग येथे असल्याचे कळले. पोलिसांनी गौरीच्या आईवडीलांची चौकशी केली. तेलीबागमध्ये गौरीच्या ओळखीचे कोणी राहते का याबद्दल पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. तिच्या पालकांनी सांगितले की, गौरीच्या ओळखीचे तिथे कोणच राहत नाही.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला पुरावा

पोलिसांची एक टीम तेलीबाग येथे सीसीटीव्ही तपासणीच्या कामास लागली. त्यानंतर पोलिसांना काही पुरावे हाती लागले. एका फुटेजमध्ये पोलिसांना गौरी रस्त्यावरुन मोबाइलवर चॅटींग करत असल्याचे दिसले. त्यानंतर ती पुढे एका मोटरसायकलवर जाऊन बसली. एक हेल्मेट घातलेला मुलगा मोटरसायकल चालवत होता. सीसीटीव्ही फुटेजमधून त्या मुलाच्या मोटरसायकलचा नंबर मात्र दिसला नाही. अनेक प्रयत्नानंतर पोलिसांना मोटरसायकलची कंपनीची माहिती मिळाली. पोलिसांनी आरटीओ ऑफिसमधून मोटरसायकलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या काही हाती लागले नाही.
Crime News: ट्रेनमध्ये पिशवीत महिलेचे हात-पाय, दोन नावांचा टॅटू, इंदूरमधील हत्येशी संबंध, गूढ वाढतंच

चौकशीत मोठा खुलासा

पोलिसांनी लोकांची चौकशी करण्यास सुरुवात केली त्यातून मोटरसायकालच्या मालकाची माहिती मिळाली. चौकशीत ही माहिती समोर आली की, मोटरसायकल हिमांशु प्रजापती याची आहे. तो गौरीचा मित्र असल्याचे समोर आले. पोलिसांनी हिमांशुची सर्व माहिती काढली. २३ वर्षीय हिमांशु राजस्थानच्या एका युनिवर्सिटी मधून बी कॉमचे शिक्षण घेत असून तो एसएससी परिक्षेची तयारी करत असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. हिमांशुच्या ओळखीच्या लोकांना सीसीटीव्ही फुटेज दाखवल्या नंतर त्याची ओळख पटली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरीला शेवटी हिमांशु सोबत पाहिले होते. पोलीस हिमांशुच्या घरी पोहचले तेव्हा समजले की, त्याचे संपूर्ण कुटुंब मुंबईला गेले आहे. फक्त हिमांशुच तेथे आहे पण तो घरातून गायब होता. पोलिसांनी त्याच तपास घेण्यास सुरुवात केली. त्याला लवकरच अटक करण्यात आले. अटक केल्यानंतर हिमांशुने या घटनेबाबत काही माहित नसल्याचे सांगितले.
नदीत वाहत आलेला मृतदेह पाहून आले पोलीस, बाहेर काढले तर झाला जिवंत, व्हिडिओ पाहून सर्वांना आले हसू..

चौकशीअंती आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली

पोलिसांनी हिमांशुची कसून चौकशी केली असता त्याने सत्य सांगितले. हिमांशुने सांगितले की, एका वर्षापूर्वी म्हणजेच २०१४ रोजी ते एका कॉमन मित्रांद्वारे भेटले होते. गौरी मोकळ्या विचाराची होती त्यामुळे तिचे अनेक मित्र होते. ती सर्वांशी व्हॉटसएपवर बोलत असे. हिमांशु सोबत ती व्हॉटसएपवरच बोलत असे. त्यानंतर दोघे भेटू लागले. जानेवारी २०१५ रोजी हिमांशूचे परिवार मुंबईला गेले. त्यानंतर हिमांशुने गौरीला घरी बोलवले. तो गौरीवर प्रेम करु लागला आणि त्याला वाटले गौरी त्याच्यावर प्रेम करते. पण गौरी त्याला एक चांगला मित्र समजत होती.

फोटो बघून भडकला हिमांशु

हिमांशुने गौरीच्या मोबाइल मागितला आणि तिला पासवर्ड विचारला. फोन तपासल्यानंतर हिमांशुने बघितले की, गौरीने तिचे फोटो तिच्या काही मित्रांना पाठवले होत. हे बघून हिमांशुला राग अनावर झाला. दोघांमध्ये भांडण झाले. यातच हिमांशुने गौरीचा गळा दाबला त्यामुळे ती बेशुद्ध झाली. हिमांशुला वाटले की गौरी मृत पावली म्हणून तो घाबरुन बाहेर गेला. त्यानंतर तो एका मित्राला घरी घेऊन आला. त्या दोघांनी गौरीचा मृतदेह ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला. हिमांशुने दुकानातून करवत आणि गोणी विकत आणले. त्यानंतर करवतने गौरीचे तुकडे केले आणि ते तुकडे गोणीत भरत शहिद पथ मार्गावर टाकले. शवविच्छेदनातून गौरी गळा दाबल्यानंतर जिवंत होती व ती कोमात गेले असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जामीन मिळाला

न्यायालयाने सांगितले की, ७५ साक्षीदार या घटनेत होते. त्यातील १४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. बाकी काही पुरावे सादर केले नाहीत. न्यायलयाने मोबाइलमधील पुरावे खोटे असल्याचे सांगितले. न्यायलयाने म्हटले की, करवतवरील रक्ताची तपासणी केली असता रक्त कोणा मुलीचे असल्याचे समोर आले. रक्त गौरीचेच आहे याबाबत काही पुरावे सादर केले गेले नाही. पोलिसांनी गौरीच्या आईवडिलांची डीएनए तपासणीसाठी नमूना पाठवला नाही. उच्च न्यायालयाने ११ जुलै २०२२ रोजी हिमांशुच्या जामीनाची याचिका फेटाळली होती. आता न्यायाधीश सौरभ लवानिया यांनी या याचिकेवर निर्णय दिला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.