Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

First Indian Woman Pilot: स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पायलट उषा सुंदरम यांच्याविषयी जाणून घ्या

10

First Indian Woman Pilot: ब्रिटीश एरो कंपनी डी हॅविलँड डोव्ह ही युद्धानंतरची ब्रिटनमधील सर्वात यशस्वी नागरी रचनांपैकी एक मानली जाते. ज्याचे मॉडेल खरेदी करण्यासाठी मद्रास सरकारने उषा सुंदरम आणि व्ही सुंदरम यांच्याशी संपर्क साधला होता. या जोडप्याने निमंत्रण स्वीकारुन एका जहाजाने इंग्लंडला गेले आणि त्यांनी नवीन डी हॅव्हिलँड डोव्ह विकत घेतले. त्यानंतर पुढील वर्षी २७ तासांचा प्रवास पूर्ण करून या विमानाचा सहवैमानिक बनून लंडनहून मुंबईला पोहोचले. या प्रवासाने पिस्टन-इंजिन डव्हने इंग्लंडहून भारतात उड्डाण करण्याचा विश्वविक्रमही केला.

विश्वासू सह-वैमानिक

उषा सुंदरम आणि त्यांचे पती व्ही सुंदरम हे अनेक प्रतिष्ठित लोकांचे विश्वासू सह-वैमानिक राहिले होते. या जोडप्याने विश्वविक्रम केला तेव्हा उषा केवळ २२ वर्षांची होती. उषाचा मोठा मुलगा सुरेश सुंदरमने सांगितले की, त्यांचे वडील कुशल पायलट होते आणि ते मद्रास फ्लाइंग क्लबमध्ये ट्रेनर होते. वडिलांशी लग्न झाल्यानंतर आईने लहान वयातच आकाशाला गवसणी घातल्याचेही त्याने सांगितले.

पहिली महिला पायलट

अशा प्रकारे उषाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय आकाशात उड्डाण करणारी पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला. आज देशातील विमान वाहतूक उद्योगात भारतीय महिला वैमानिकांचा वाटा १५ टक्के आहे, तर जागतिक सरासरी केवळ ५ टक्के आहे. पण त्यावेळी कॉकपिटमध्ये महिला असणे ही एक विलक्षण गोष्ट होती.

१९४६ मध्ये उषा आणि त्यांचे पती बंगलोरला गेले. त्यानंतर १९४८ मध्ये, जक्कूर येथे सरकारी फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल (GFTS) ची स्थापना झाल्यानंतर, व्ही सुंदरम यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४९ मध्ये त्या ट्रेनिंग स्कूलमधून उत्तीर्ण होणारी उषा पहिली महिला ठरली आणि भारताची पहिली महिला पायलट बनली. म्हैसूरच्या महाराजांच्या डकोटा डिसी-३ या विमानाचे वैयक्तिक वैमानिक म्हणून उषा आणि त्यांचे पती निवडले गेले. उषा आणि व्ही सुंदरम हे पंडित नेहरूंच्या नावासह अनेक नामवंत लोकांचे पायलट होते.

फाळणी दरम्यान सेवा आणि सेवानिवृत्ती
फाळणीनंतर पाकिस्तानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे धाडसी आणि अत्यंत प्रशंसनीय काम उषाने केले. त्यांनी अनेक वेळा प्रवास केला आणि भारतीय नागरिकांना त्यांच्या घरी सुखरूप परत आणले. तिने आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी १९५२ मध्ये सेवानिवृत्ती घेतली पण त्यांचे पती पायलट म्हणून काम करत राहिले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.