Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

…तर बदलापूरमधला अत्याचार टळला असता? मुख्याध्यापक संघटनेचं थेट मर्मावरच बोट

8

Badlapur Assault : विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेला ‘शिपाई काका’ हा घटक हरवत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर होत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र टाइम्स
रोहन टिल्लू, मुंबई : बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर तेथील कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर वातावरण तापले असताना, आता बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेने एका महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष वेधले आहे. खासगी अनुदानित शाळांमध्ये सन २०१८ पासून पूर्णवेळ शिपाईपदासाठी भरतीच झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील दहा हजारांवर शाळांमध्ये सुमारे साडेचार हजार पदांवर पूर्णवेळ शिपाईच नाहीत. या जागी कंत्राटी कर्मचारी नेमण्यात येत असून ते दर काही महिन्यांनी बदलत असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेला ‘शिपाई काका’ हा घटक हरवत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर होत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

बदलापूर घटनेतील आरोपी कंत्राटी कर्मचारी होता. मागील काही वर्षांपासून सरकारने खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगत, दरमहा केवळ १० हजार रुपयांचीच तजवीज केली होती. शाळा प्रशासनालाही मासिक १० हजार रुपयांमध्ये शिपाईपदावरील माणूस नेमून त्याला निवृत्तीवेतन व इतर लाभ देणे शक्य नव्हते. त्यामुळे बहुतांश खासगी अनुदानित शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिपायांची भरती झाली, असे बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी स्पष्ट केले. बदलापूरच नाही, तर याआधी शाळांमध्ये घडलेल्या अशा गैरप्रकारांमध्ये कंत्राटी तत्त्वावर सेवेत असलेल्यांकडून गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने खासगी अनुदानित शाळांनाच नाही, तर राज्यभरातील सर्वच शाळांना पूर्णवेळ शिपाई नेमण्याचे निर्देश देणे गरजेचे आहे, अशी मागणीही पाटील यांनी या निमित्ताने केली.

…तर बदलापूरमधला अत्याचार टळला असता? मुख्याध्यापक संघटनेचं थेट मर्मावरच बोट

कायमस्वरूपी शिपाई का महत्त्वाचे?

शिपाई हा मुख्याध्यापकांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखा असतो. तो सतत शाळेत फिरत असतो, त्याचे अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष असते. एखादा विद्यार्थी आगळीक करत असेल, तर त्याला दटावण्याचे कामही शिपाई करतात. त्यामुळे शाळा या परिसंस्थेत शिपाई हा महत्त्वाचा घटक असतो. तो शाळेच्या कायमस्वरूपी सेवेत असेल, तर तो आणखी मनापासून काम करतो. तसेच त्याच्या वेतनापासून नोकरीपर्यंत अनेक गोष्टी शाळा प्रशासनाच्या हाती असल्याने तो शाळेला उत्तरदायी असतो.
आधी धाकटा लेक गेला, मग मोठ्या मुलाची पुण्यात आत्महत्या, मायबापाने आठ दिवसातच मृत्यूला कवटाळलं, दोन चिठ्ठ्या सापडल्या

विद्यार्थ्यांसाठी ‘सदिच्छादूत’

शिपाई हे विद्यार्थ्यांसाठी शाळांमधील ‘फर्स्ट पॉइंट ऑफ काँटॅक्ट’ असतात. शिक्षकांपेक्षाही विद्यार्थ्यांचा शिपायांसोबत जास्त संबंध येतो. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळे नातेही असते. मधल्या सुट्टीची आणि शाळा सुटल्याची घंटा वाजवणारे शिपाईकाका विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचे असतात. अनेक माजी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्याही आधी शिपाईकाका किंवा शिपाईमामांना भेटतात. मधल्या सुट्टीत शाळेच्या प्रवेशद्वाराकडे सरकणाऱ्या विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणारे, उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना नजरेनेच दमात घेणारे आणि खेळाच्या मैदानात पडल्यावर जखमेवर ‘लाल औषध’ लावणारे शिपाईकाका हे विद्यार्थ्यांसाठी सदिच्छादूत असतात.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.