
Tej Police Times
त्यानुसार जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये या पापडांचे वाटप करीत सोशल मीडियावरून प्रसिद्धी करण्यात शिक्षण विभागाने यश मिळविले असले, तरी अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी हा पापड खाल्लाच नसल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी वातड पापड मिळाले, तर काही शाळांमध्ये पापडाला तळकट वास आल्याची माहिती शाळांनी दिली. अनेक विद्यार्थ्यांनी हे पापड न खाल्ल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांकडे ते परत देण्यात आले.
SSC HSC Exam: बोर्ड परीक्षांचे काउंटडाउन सुरु, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट
गेल्या काही वर्षांत वरिष्ठ स्तरावरून सात्यत्याने उपक्रमांचा भडीमार होत आहे. दर महिन्यात काही तरी ‘साजरे’ करण्याच्या आदेशामुळे औपचारिकता म्हणून असे उपक्रम राबविण्याकडे शिक्षण विभागाचा कल वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून असे नावापुरते उपक्रम राबविले जात असून, यामध्ये विद्यार्थ्यांचे नेमके कसे आणि किती नुकसान होत आहे, याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही.
तळलेल्या पापडातून काय पोषण मिळणार हा विचार करणे गरजेचे होते. पापडाऐवजी नाचणीचे अन्य पदार्थ देण्याचा विचार करणे गरजेचे होते. सेंट्रल किचनच्या कमिटीवर एखादा आहारतज्ज्ञ असेल तर त्यांच्याकडून यावर सल्ला घेऊन पदार्थ निश्चित करणे गरजेचे आहे. हा मनमानी कारभार योग्य नाही.
– नंदलाल धांडे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक महासंघ
तळलेले पापड केवळ या आठवड्यासाठी देण्यात आले होते. यापूर्वी राजगिरा लाडू व केळी दिली जात होती. पुढील आठवड्यात भगर दिली जाणार आहे. नाचणीचा आहारही पोषण आहारांतर्गतच येतो. सर्व नियम पाळून पापडाचे वाटप करण्यात आले. याबाबत कोणतीही तक्रार शिक्षण विभागाकडे आलेली नाही.
– भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी, जि. प. प्राथमिक शिक्षण विभाग
MU Students Hostel: मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात राहण्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये पेच
PM Shri Scheme: राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेअंतर्गत होणार सर्वांगीण विकास
Recover your password.
A password will be e-mailed to you.