
Tej Police Times
अधीक्षक रवींद्र टोणगे यांना कोणताही शेतीचं गधं नव्हता. पूर्वीपासून वडिलांचा गारमेंटचा व्यवसाय होता. टोणगे हे ठाणे शहरात रहायचे. मात्र टोणगे यांनी जिद्द चिकाटी, मेहनत घेत कारागृहाच्या आतील जागेचं नंदनवन केलं आहे. या कारागृहाच्या आतील जागा जंगलमय पडीकच जागा होती. मात्र २०२२ मध्ये जिल्हा कारागृह अधीक्षक रवींद्र टोणगे हे रुजू झाल्यानंतर आणि कारागृहातील आतील जगंलमय काही भाग बघून त्यांना विचित्र वाटायचं. अधीक्षक रवींद्र टोणगे यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांची सहकार्य घेत आणि बंदिवान कैद्यांची मद्यत घेऊन प्रबळ इच्छाशक्ती जोरावर अक्षरशः त्यांनी कायापालट केला. कारागृहाच्या आतील पडीक जमिनीची मशागत करून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे आता कारागृहाचे नंदनवन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्लीज नाही, जरागेंवर प्रश्न आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उत्तर टाळलं
बंदिवान कैद्यांमार्फत कारागृहाच्या परिसरामध्ये गवार, शेवगा शेंग, पडवळ, भेंडी, कारले, वाल शेंग, चवळी, दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची, वांगे, दोडके इत्यादी फळभाजी आणि लाल माठ, हिरवा माठ, पालक, मुळा, कोथिंबीर जवळपास २७ प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. या कारागृहातील बंदीना भाज्या दिल्या जातात. तसेच सावंतवाडी येथे वर्ग २ चे कारागृह त्या ठिकाणी भाजी पाठवली जाते. उर्वरित भाजी सरकारी दराप्रमाणे स्थानिक बाजारात विकली जाते. त्यातून उत्पन्न ९ महिन्यांमध्ये ३ लाख ९८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
केलेल्या कार्याची दखल घेत राज्याचे पोलीस महानिरीक्षकांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक केले आहे. मात्र या कारागृहात केवळ शेती करून थांबले नाही तर एक गाय आणि वासरू आणून गोपालन सुरू केले आहे. गोपालनामुळे शेतीसाठी लागणारे जीवामृतही तयार करून शेतीसाठी वापरण्यात येते. कारागृहातील शेती करण्यामध्ये जसे कारागृह अधीक्षक रवींद्र टोणगे यांचे मोठे योगदान आहे. मात्र जिल्हा कारागृहाचे नंदनवन करणारे अधीक्षक रवींद्र टोणगे यांची मुंबईत ऑर्थर रोड कारागृहात बदली झाली आहे. मात्र २ एकर क्षेत्रांवर केलेली शेतीचं काय होणार असा प्रश्न देखील समोर पडला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.